Breaking
28 Oct 2025, Tue

गोविंद बल्लभ पंत एका राष्ट्रवादी व्यक्तिमत्त्वाची कहाणी

त्यागाशिवाय कुणीही मोठे होत नाही ज्यांचे नाव झाले त्यांचा त्याग ही तितकाच मोठा आहे . पंडित गोविंद बल्लभ पंत हे भारतीय इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणून नेहमी स्मरणात राहतात, ज्यांनी एक यशस्वी वकील आणि स्वातंत्र्यसैनिक ते एक कुशल प्रशासक अशी म्हणून त्याची ख्याती होती , एका छोट्या गावातून सुरू झाला आणि देशाच्या सर्वोच्च पदांपर्यंत ते गेले , त्यांनी राष्ट्र उभारणीच्या अनेक महत्त्वाच्या टप्प्यांवर निर्णायक योगदान दिले.उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे चौथे गृहमंत्री म्हणून ओळखले जाणारे गोविंद बल्लभ पंत . हिंदीला केंद्र शासनाची अधिकृत भाषा करण्यासाठी केलेले योगदान ऐतिहासिक ठरले. त्यांना १९५७ मध्ये ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले,

१० सप्टेंबरआज पंडित गोविंद बल्लभ पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे राजकीय, सामाजिक आणि संस्थात्मक योगदान आपण लक्षात घेऊ त्याच्या विषय लिहताना जे मला आनंद होत आहे तो वेगळाच आहे . १० सप्टेंबर १८८७ रोजी अल्मोडा जिल्ह्यातील खुंट गावात जन्मलेले पंत हे स्वातंत्र्यसंग्रामातील अग्रणी नेते,त्यांनी वयाच्या १० व्या वर्षापर्यंत घरीच शिक्षण घेतले आणि त्यानंतर १८९७ मध्ये त्यांना स्थानिक ‘रामजे कॉलेज’च्या प्राथमिक शाळेत दाखल करण्यात आले. अलाहाबाद विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी काशीपूर येथे वकिली सुरू केली. प्रारंभीच्या कार्यात कुमाऊं भागातील कुली-बेगार प्रथेच्या विरोधातील आंदोलन विशेष ठरले.त्यांचे सुरुवातीचे जीवन अनेक वैयक्तिक दु:खांनी भरलेले होते. १९०९ मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर लवकरच त्यांचे वडील आणि त्यानंतर त्यांचा मुलगा जन्मानंतर काही महिन्यांतच मरण पावला, आणि १९१४ मध्ये त्यांच्या दुसऱ्या पत्नीचेही निधन झाले.अनेक आघात त्याच्यावर झाले .

पंत यांनी १९०९ मध्ये कायद्याची पदवी संपादन केली. या परीक्षेत त्यांना विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे त्यांना ‘लम्सडेन’ सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. १९१० मध्ये त्यांनी काशीपूरमध्ये वकिली सुरू केली. त्यांचा पहिला महत्त्वाचा खटला १९१२-१३ मध्ये श्री कुंजबिहारी लाल यांचा होता, ज्यासाठी त्यांना ५ रुपये शुल्क मिळाले होते. १९१६ मध्ये पंतजींचा काशीपूरच्या ‘नोटीफाइड एरिया कमिटी’ मध्ये समावेश करण्यात आला आणि नंतर त्यांना शिक्षण समितीची जबाबदारीही देण्यात आली.१९२८ मध्ये ते नैनीताल जिल्हा मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले, या पदावर त्यांनी यापूर्वी १९२०-२१ मध्येही काम केले होते. त्यांच्या नेतृत्वाची मुळे स्थानिक लोकांशी जोडलेली होती आणि त्यांचे कार्य केवळ राजकीय नव्हते तर समाजातील अन्याय आणि शोषणाविरुद्धचे एक स्पष्ट अभियान होते. १९१६ मध्ये, लखनऊ काँग्रेस अधिवेशनात त्यांनी लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची भेट घेतली आणि त्यांच्या विचारांनी ते खूप प्रभावित झाले.१९२३ मध्ये ते ‘स्वराज पक्षा’चे उमेदवार म्हणून उत्तर प्रदेश विधान परिषदेची निवडणूक जिंकले.९ ऑगस्ट १९२५ रोजी, जेव्हा काकोरी येथे क्रांतिकारकांनी सरकारी तिजोरी लुटली, तेव्हा त्या खटल्याचे समर्थन करणाऱ्या वकिलांपैकी ते एक होते.१९३० च्या मीठ सत्याग्रहात आणि सविनय कायदेभंग चळवळीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. स्वातंत्र्यलढ्यात त्यांना अनेक वेळा अटक करण्यात आली.पंडित गोविंद बल्लभ पंत हे संयुक्त प्रांतातून संविधान सभेवर निवडून गेले,संविधान सभेत त्यांनी स्वतंत्र मतदारसंघ, नागरिकत्व, मालमत्तेचे हक्क आणि संघराज्यवादासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाषणे दिली.ची अशी दृढ धारणा होती की, भारतीय संविधान हे केवळ एक कायदेशीर दस्तऐवज नसावे, तर ते सामाजिक क्रांतीचे एक साधन असावे.


स्वातंत्र्यानंतर १९५० ते १९५४ पर्यंत त्यांनी स्वतंत्र भारतातील उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केले.  त्यांच्या कार्यकाळातील सर्वात मोठे आणि महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे ‘जमीनदारी व्यवस्था’ रद्द करणारा कायदा आणणे आणि तो देशभरात कठोरपणे लागू करणे.१९५५ मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून नियुक्त केले आणि १९६१ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत ते या पदावर कार्यरत होते. २६ जानेवारी १९५७ रोजी पंतांना भारताचे सर्वोच्च नागरी सन्मान “भारतरत्न” देण्यात आला. त्यांच्या नावाने अनेक रुग्णालये, संस्था, मार्ग आणि विद्यापीठे ओळखली जातात. १९६० मध्ये सुरू झालेले पंतनगर कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ १९७२ मध्ये त्यांच्या स्मरणार्थ नामांतरित झाले.पंडित पंत हे केवळ एक वकील आणि राजकारणीच नव्हते, पंडित पंत यांच्या स्मृती देशभरातील अनेक संस्था आणि महत्त्वाच्या ठिकाणी जतन केल्या आहेत. यात नवी दिल्लीतील ‘पंडित गोविंद बल्लभ पंत हॉस्पिटल’ आणि ‘पंडित पंत मार्ग’ यांचा समावेश आहे उत्तराखंडमधील ‘पंडित गोविंद बल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ’ आणि ‘पंडित गोविंद बल्लभ पंत अभियांत्रिकी महाविद्यालय’ हे कृषी आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या दूरदृष्टीचे प्रत्यक्ष प्रतीक आहेत.तर एक प्रतिभावान लेखक आणि नाटककार देखील होते.त्यांनी ‘राजमुकुट’ हे ऐतिहासिक नाटक लिहिले, जे मेवाडच्या पन्ना धाईच्या अतुलनीय त्यागावर आधारित आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी ‘अंधारे में उजाला’, ‘अंतहपूर का छिचर’, ‘बाला बंजारा’, ‘जुनिया’, ‘मैत्रेय’, ‘पर्ण’, ‘प्रतिबिंब’, ‘प्रतिमा’ आणि ‘यामिनी’ यांसारख्या अनेक कादंबऱ्या आणि नाटकांची रचना केली.त्यांचे कार्य, त्यांच्या प्रशासकीय सुधारणा, संविधान निर्मितीतील त्यांचा सहभाग आणि त्यांची अटूट राष्ट्रवादी दृष्टी दर्शवते की, ते केवळ एक राजकारणी नव्हते, तर ते एक दूरदर्शी नेते होते ज्यांनी आपल्या देशाच्या भविष्याचा पाया रचला. त्यांचा वारसा आजही त्यांच्या नावावर असलेल्या संस्था, त्यांचे आदर्श आणि त्यांनी समाजात रुजवलेली मूल्ये यांच्या माध्यमातून जिवंत आहे.

७ मार्च १९६१ रोजी दिल्ली येथे हृदयविकाराने पंत यांचे निधन झाले. त्यावेळी ते केंद्रीय गृहमंत्री पदावर कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने स्वातंत्र्योत्तर भारतातील एक स्थिर आणि दूरदर्शी आवाज हरपला.








Samsung Galaxy S24 Snapdragon 8 Gen 3 भारतात लॉन्च; Exynos पेक्षा जास्त पॉवर, कमी किंमत

By Ruturaj Nalawade

Digital creator · Journalist · Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *